महाराष्ट्र

गणेशोत्सवात छत्री घेऊनच बाहेर पडा! महाराष्ट्रात तीन-चार दिवस मुसळधार

ऑगस्ट महिन्यात ओढ दिलेल्या मान्सूनने गोकुळाष्टमीपासून पुन्हा हजेरी लावली आहे. अशातच, आता पुढील तीन-चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : ऑगस्ट महिन्यात ओढ दिलेल्या मान्सूनने गोकुळाष्टमीपासून पुन्हा हजेरी लावली आहे. अशातच, आता पुढील तीन-चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या ४८ तासात राज्यात मान्सून सक्रिय राहणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.

येत्या ४८ तासात राज्यात मान्सून सक्रिय राहणार आहे. रायगड, भंडारा, गोंदिया, नागपूरमध्ये तुरळक ते मुसळधार ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील उर्वरित भागात मेघगर्जेनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

२५ व २६ तारखेला राज्यात विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यातही दुपारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून गणेशोत्सव काळात छत्री घेऊनच बाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाने नागरिकांना केले आहे.

दरम्यान, ऑगस्ट महिना उजाडला तरी अपेक्षेप्रमाणे पाऊस न पडल्याने पीक अक्षरशः कोमेजली आहेत. लाखोंचा खर्च वाया जातो की काय, अशी चिंता सध्या शेतकऱ्यांना सतावतांना दिसून येत होती. परंतु, हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप