महाराष्ट्र

भाजपा सरकारपेक्षा राज्यातील कायदा सुव्यवस्था सुस्थितीत; गृहमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Published by : Lokshahi News

यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपले. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील गुन्ह्यांची टक्केवारी कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना राज्यभरात वाढलेल्या गुन्हेरागारीच्या टक्क्यावर टीका केली. राज्यातील बलात्कांराचा संख्या दहा टक्क्यांनी घटल्याची माहिती देशमुख यांनी दिली. तसेच महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या ९५९ ने घटल्याचे त्यांनी सांगितले.

पॉक्सो अंतर्गत होणाऱ्या गुन्ह्यांमध्येही घट झाली असून कायदा व सुव्यवस्थेची आकडेवारी भाजपा सरकारपेक्षा घटल्याचे देशमुख म्हणाले. राज्यातील कन्व्हिक्शन रेट देखील १३ टक्क्यांनी वाढल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना, देशभरातील गुन्ह्यांमध्ये राज्याच्या स्थितीचे वर्णन केले. बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशभरात २२ व्या स्थानी आहे. तर खून आणि हत्येच्या प्रकरणांमध्ये २५ व्या ठिकाणी असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Shivsena on Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर शिवसेनेचे कडवट बोल ! मोठ्या भावावर निशाणा तर लहान भावाचे कौतुक