महाराष्ट्र

शर्जील उस्मानीच्या अटकेसाठी पथक रवाना करणार – गृहमंत्री

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

यंदाची एल्गार परिषद पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याचे संकेत आहेत. अलिगढ विद्यापीठाचा विद्यार्थी शर्जील उस्मानी याने केलेल्या विधानांमुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शर्जीलने हिंदूंविरोधात टिप्पणी केल्यानंतर भाजपाने हा मुद्दा प्रतिष्ठेचा करत त्याला विरोध नोंदवला होता. तसेच शर्जीलवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहिले होते.

आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. शर्जील उस्मानी महाराष्ट्रात नसल्याचे सांगत त्याला ताब्यात घेण्यासाठी पथकाची स्थापना केल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. एल्गार परिषदेबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pigeon Feeding : नियंत्रित पद्धतीने कबुतरांना खाद्य देण्यासाठी तीन संस्थांनाचे अर्ज

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Accident : मुंबईच्या शिवडी येथे शाळेच्या बसचा अपघात; 4 मुलं जखमी

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे