महाराष्ट्र

शर्जील उस्मानीच्या अटकेसाठी पथक रवाना करणार – गृहमंत्री

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

यंदाची एल्गार परिषद पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याचे संकेत आहेत. अलिगढ विद्यापीठाचा विद्यार्थी शर्जील उस्मानी याने केलेल्या विधानांमुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शर्जीलने हिंदूंविरोधात टिप्पणी केल्यानंतर भाजपाने हा मुद्दा प्रतिष्ठेचा करत त्याला विरोध नोंदवला होता. तसेच शर्जीलवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहिले होते.

आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. शर्जील उस्मानी महाराष्ट्रात नसल्याचे सांगत त्याला ताब्यात घेण्यासाठी पथकाची स्थापना केल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. एल्गार परिषदेबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा