महाराष्ट्र

हवामान खात्याकडून नागरिकांना दिलासादायक बातमी! पावसाचा जोर ओसरणार

राज्यभरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा स्थितीत हवामान विभागाने नागरिकांना दिलासादायक बातमी दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यभरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत हवामान विभागाने नागरिकांना दिलासादायक बातमी दिली आहे. उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, उद्यापासून राज्यात मान्सूनची तीव्रता कमी होणार आहे. दक्षिण ओरिसा भागात असलेल्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली असून राज्यावरचा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे स्थित आहे. यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. १ ऑगस्टपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी पाऊस होणार आहे. तर, पुण्यात पुढचे काही दिवस ढगाळ हवामान राहील.

दरम्यान, मागील काही दिवासांपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर, नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. तसेच, अनेक धरणे भरली आहेत तर काही भरण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे काही ठिकाणी दुर्घटना घडण्याचे प्रमाणही वाढले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा