महाराष्ट्र

नागरिकांना उकाड्यापासून मिळणार दिलासा; पुढील चार दिवस तापमानात मोठी घट

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल धर्माधिकारी | पुणे : राज्यात उष्णतेची लाट आलेली असून नागरिक हैराण झाले आहेत. अशातच, हवामान विभागाकडून नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे. उद्यापासून उकाड्यापासून सुटका होणार असल्याचे हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे. पुढील ४ दिवसात राज्यातील उष्णतेत मोठी घट होणार आहे.

संपूर्ण राज्यातील कमाल तापमानात उद्यापासून पुढील ४ दिवस घट होणार असून उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासंदर्भातील माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. तर, दुसऱ्या बाजूला, गेल्या काही दिवसात राज्याच्या अनेक भागात तापमान ४० अंशाच्या वर जात आहे. एप्रिल किंवा मे महिन्यात ४० अंश तापमान बऱ्याचदा नोंदी झाल्या आहेत. तर, चंद्रपूरात विक्रमी तापमानाची नोंद होत होती. ४० अंशापेक्षा जास्त तापमान गेल्यावर नागरिकांनी काळजी घ्यावी, अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. तर दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत लोकांनी गरज नसेल तर बाहेर पडू नये, असे देखील आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

"छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही"; नाशिकमध्ये उद्धव ठाकरे कडाडले

"इंडिया आघाडीच्या नादाला लागून उबाठाने पाकिस्तानची हुजरेगिरी केली"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Daily Horoscope 16 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ; पाहा तुमचे भविष्य

"काँग्रेस फक्त हिंदू-मुस्लिमांचं राजकारण करतं"; कल्याणच्या सभेत PM मोदींची तोफ धडाडली

दिनविशेष 16 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना