महाराष्ट्र

नागरिकांना उकाड्यापासून मिळणार दिलासा; पुढील चार दिवस तापमानात मोठी घट

राज्यात उष्णतेची लाट आलेली असून नागरिक हैराण झाले आहेत. अशातच, हवामान विभागाकडून नागरिकांना गुडन्यूज देण्यात आली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल धर्माधिकारी | पुणे : राज्यात उष्णतेची लाट आलेली असून नागरिक हैराण झाले आहेत. अशातच, हवामान विभागाकडून नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे. उद्यापासून उकाड्यापासून सुटका होणार असल्याचे हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे. पुढील ४ दिवसात राज्यातील उष्णतेत मोठी घट होणार आहे.

संपूर्ण राज्यातील कमाल तापमानात उद्यापासून पुढील ४ दिवस घट होणार असून उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासंदर्भातील माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. तर, दुसऱ्या बाजूला, गेल्या काही दिवसात राज्याच्या अनेक भागात तापमान ४० अंशाच्या वर जात आहे. एप्रिल किंवा मे महिन्यात ४० अंश तापमान बऱ्याचदा नोंदी झाल्या आहेत. तर, चंद्रपूरात विक्रमी तापमानाची नोंद होत होती. ४० अंशापेक्षा जास्त तापमान गेल्यावर नागरिकांनी काळजी घ्यावी, अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. तर दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत लोकांनी गरज नसेल तर बाहेर पडू नये, असे देखील आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rohit Pawar On ED Action : '...आणि म्हणून माझ्या एकट्यावर EDची कारवाई केली' रोहित पवारांनी सगळंच सांगितलं

Sambhajiraje Chhatrapati : 'युनेस्को गडकिल्ल्यांचे ब्रँडींग करेल, जतन आपल्याला करायचंय'; छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया

Morning Tea Habits : रिकाम्या पोटी चहा पिताय ? मग 'या' गोष्टी ध्यानात घ्या अन्यथा...

EPFO Users : पीएफ खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! तुमच्याही खात्यात व्याजाचे पैसे जमा झाले नाहीत?; जाणून घ्या उपाय