महाराष्ट्र

आव्हाडांची तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – अतुल भातखळकर

Published by : Lokshahi News

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करुन जामिनावर सोडण्यात आलं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली. या बातमीनंतर विरोधी पक्षनेते आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाडांची तत्काळ मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची अटक करून जामीनावर हे प्रकरण थांबणार नाही आहे. आव्हाडांची तत्काळ मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली.तसेच मुख्यमंत्र्यांनी केली नाही तर आम्ही राज्यपालांना विनंती करू असे भातखळकर म्हणाले.

गुंड लोकांचे हे सरकार आहे. या भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी मंत्रीमंडळातील एक-एक मंत्र्यांच्या अटकेला प्रारंभ झाला आहे. आव्हाडांचा पहिला लागला आता देशमुखांचा नंबर लागणार आहे, असेही भातखळकर म्हणाले आहेत.

गुंड मंत्र्यांला मंत्रिमंडळात ठेऊ नये

ठाण्यातला सिव्हील इंजिनिअर तरुणाचे अपहरण करणे, मारहाण करणे या प्रकरणात सव्वा वर्ष आम्ही न्याय मागत होतो, कोर्टाने आज अखेर न्याय दिला.जितेंद्र आव्हाड यांना अटक केली. आता अशा गुंड मंत्र्यांला मंत्रिमंडळात ठेवता येऊ नये असे विधान किरीट सोमय्या यांनी केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा