महाराष्ट्र

पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

राज्यभरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अशा स्थितीत हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्याला इशारा जारी केला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यभरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्याला इशारा दिला आहे. पुढील पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा विकसित झाला आहे. आणि वायव्य दिशेला त्याची हालचाल होण्याची शक्यता असल्याने पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. तर, मुंबई, पालघर, ठाण्यासह रायग, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, बुलढाणा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक धरणे भरली आहेत तर काही भरण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर, दुर्घटना घडण्याचे प्रमाणही वाढले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले असून पुरसंभाव्य ठिकाणांवर एनडीआरएफ टीम तैनात केल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?