महाराष्ट्र

वर्ध्यात ‘लालनाला’ धरणाचे ५ दरवाजे उघडले

Published by : Lokshahi News

प्रतिनिधी | भूपेश बारंगे
संपूर्ण राज्यात पावसाने थैमान घातले आहे. हवामान विभागाकडून पुढील ५ दिवस सतर्कतेचा इशारा केला आहे. याच पार्श्वभूमीवर वर्ध्यात जिल्ह्यात आठ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील धरणाने पातळी गाठली नसली तरी पावसाच्या अंदाजानुसार समुद्रपूर तालुक्यातील कोरा येथील लाल नाला धरणाचे 5 दरवाजे आज सकाळी 10 सेंटीमीटर ने उघडण्यात आले.

सध्या या दरवाज्यातून 25.07 क्युमेंक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या संलग्न डोंगरगाव, असोला, नारायणपूर,चिखली, कोरा,मंगरूळ,सिल्ली, दसोडा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री.वर्मा यांनी केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा