IndiGo Flights Cancelled 
महाराष्ट्र

IndiGo Flights: प्रवाशांचे हाल! इंडिगोची अडचणी सुरुच, ८ विमानतळांवर 100 पेक्षा अधिक फ्लाइट्स रद्द

IndiGo Flights Cancelled: इंडिगो एअरलाइन्सच्या तांत्रिक बिघाड, क्रू कमतरता आणि खराब हवामानामुळे देशभरातील ८ विमानतळांवर १०० पेक्षा अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

भारतीय विमान कंपनी इंडिगो सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. कारण देशभरातील अनेक विमानतळांवरील त्यांच्या उड्डाणे सतत रद्द केली जात आहेत. गुरुवारी म्हणजेच आज ४ डिसेंबर २०२५ रोजी १०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ज्यामुळे प्रवाशांना मोठी गैरसोय भासत आहे. काही उड्डाणे तांत्रिक समस्यांमुळे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर काहींना क्रू मेंबर्सची कमतरता भासत आहे. या कारणामुळे अनेक प्रवासी तासनतास विमानतळावर थांबले होते, पण शेवटच्या क्षणी त्यांचे विमान रद्द होण्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागला.

गुरुवारी हैदराबाद आणि दिल्ली विमानतळांवर प्रवाशांच्या लांब रांगाही पाहायला मिळाल्या. मात्र इंडिगोच्या या विभागातील चुका आणि व्यवस्थापनाविरुद्ध नाते सोशल मिडियावरही प्रचंड आक्षेप नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्याचा आलेख आहे. बेंगळुरु येथे ४२, दिल्लीमध्ये ३८, अहमदाबादमध्ये २५, इंदूरमध्ये ११, हैदराबादमध्ये १९, सुरतमध्ये ८, आणि कोलकातामध्ये १० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

इंडिगो एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात त्यांनी मान्य केले की, खराब हवामान, सिस्टीममधील बिघाड आणि नवीन कर्मचाऱ्यांच्या नियमांमुळे उड्डाणांवर परिणाम झाला आहे. कंपनीने प्रवाशांबद्दल दिलगीर व्यक्त केली आहे आणि पुढील ४८ तासांत विमानसेवा पूर्णपणे पूर्ववत करण्याचा आश्वास दिला आहे.

मॅन्युअल चेक-इन प्रक्रियेमुळे प्रवाशांना अतिरिक्त २५ ते ४० मिनिटे लागू लागतात. जेणेकरून सामान सोडणे आणि सुरक्षा तपासणी देखील उशिराने होत आहे. एकंदर पाहता, इंडिगोच्या सिस्टीममध्ये झालेल्या बिघाडामुळे उड्डाणांवर मोठं प्रभाव पडला आहे आणि प्रवाशांसमोर गैरसोयीचे वनदिशा खुले झाले आहेत.

  • इंडिगोने ८ विमानतळांवर १०० हून अधिक उड्डाणे रद्द केली.

  • तांत्रिक बिघाड, क्रू कमतरता आणि हवामान ही प्रमुख कारणे सांगितली.

  • प्रवाशांना तासनतास रांगेत थांबावे लागल्याने मोठी गैरसोय झाली.

  • इंडिगोने ४८ तासांत सेवा सामान्य करण्याचे निवेदन जारी केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा