महाराष्ट्र

मुळा धरणामध्ये आंदोलकांचे उड्या घेऊन जलसमाधी आंदोलन; पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला

स्वाभिमानीच मुळा धरणामध्ये जलसमाधी आंदोलन

Published by : Shweta Shigvan-Kavankar

गोविंद साळुंखे | अहमदनगर : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शिवसेनेने मुळा धरणावर जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान काही कार्यकर्त्यांनी मुळा धरणाच्या पाण्यात उड्या घेतल्या. यामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. मात्र, पोलिसांनी देखील पाण्यामध्ये उड्या घेऊन आंदोलकांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 40 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करा, असा  शासनाला 7 दिवसाचा अल्टीमेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शिवसेनेने दिला होता. मात्र, अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले होते. यानुसार आंदोलक मुळा धरणावर पोहोचत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी मुळा धरणांमध्ये उड्या घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, धरण परिसरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त असल्याने धरणात उड्या घेतलेल्या चार आंदोलकांना पोलिसांनी पाण्यात जाऊन बाहेर काढलं आणि तात्काळ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू