महाराष्ट्र

जलयुक्त शिवारबाबत देवेंद्र फडणवीसांची महत्वाची माहिती; म्हणाले...

कमी पाऊस होत आहे, त्यामुळे जलसंधारण शिवाय पर्याय नाही.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महाराष्ट्रात जलयुक्त शिवार महत्वाचं आहे. कमी पाऊस होत आहे, त्यामुळे जलसंधारण शिवाय पर्याय नाही. जलयुक्त शिवार २ टप्पा सुरु होत आहे. पहिला टप्प्यात पाच हजार गावे घेतली आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. ते पुण्यात बोलत होते.

महाराष्ट्रात जलयुक्त शिवार महत्वाचं आहे. कमी पाऊस होत आहे, त्यामुळे जलसंधारण शिवाय पर्याय नाही. मागच्या काळात जलयुक्तशिवार सारखी योजना चालवली. आणि २० हजार गावांमध्ये जलसंधारण कामे केली. यामुळे ३७ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. त्यामुळे रब्बीचा पेरा वाढला. मोठ्या प्रमाणात दोन पीक घेता आली. आता ती योजना पुन्हा सुरु करत आहोत. जलयुक्त शिवार २ टप्पा सुरु होत आहे. पहिला टप्प्यात पाच हजार गावे घेतली आहेत, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.

यावेळेस हवामान तज्ञांनी काही अंदाज दिले त्यानुसार अलनिनो संदर्भात काही सांगितलं आहे. त्यामुळे हे वर्ष अलनिनो असेल तर जलसंधारण करावं लागणार आहे. पाणी साठवावं लागणार आहे. त्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. ४० हजार शेतकऱ्यानं पाणी फाउंडेशनने सामावून घेतलं आहे. पाणी फाउंडेशन सारख्या ज्या ज्या संस्था असतील त्यांना सोबत घेऊन आताही काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. यावेळी जलयुक्त शिवार ही योजना पुन्हा कार्यन्वित करण्याची घोषणा फडणवीसांनी केली. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जलयुक्त शिवार योजना 25 हजार गावांमध्ये ही योजना राबवण्यात येईल. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेस 3 वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test