महाराष्ट्र

जलयुक्त शिवारबाबत देवेंद्र फडणवीसांची महत्वाची माहिती; म्हणाले...

कमी पाऊस होत आहे, त्यामुळे जलसंधारण शिवाय पर्याय नाही.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महाराष्ट्रात जलयुक्त शिवार महत्वाचं आहे. कमी पाऊस होत आहे, त्यामुळे जलसंधारण शिवाय पर्याय नाही. जलयुक्त शिवार २ टप्पा सुरु होत आहे. पहिला टप्प्यात पाच हजार गावे घेतली आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. ते पुण्यात बोलत होते.

महाराष्ट्रात जलयुक्त शिवार महत्वाचं आहे. कमी पाऊस होत आहे, त्यामुळे जलसंधारण शिवाय पर्याय नाही. मागच्या काळात जलयुक्तशिवार सारखी योजना चालवली. आणि २० हजार गावांमध्ये जलसंधारण कामे केली. यामुळे ३७ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. त्यामुळे रब्बीचा पेरा वाढला. मोठ्या प्रमाणात दोन पीक घेता आली. आता ती योजना पुन्हा सुरु करत आहोत. जलयुक्त शिवार २ टप्पा सुरु होत आहे. पहिला टप्प्यात पाच हजार गावे घेतली आहेत, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.

यावेळेस हवामान तज्ञांनी काही अंदाज दिले त्यानुसार अलनिनो संदर्भात काही सांगितलं आहे. त्यामुळे हे वर्ष अलनिनो असेल तर जलसंधारण करावं लागणार आहे. पाणी साठवावं लागणार आहे. त्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. ४० हजार शेतकऱ्यानं पाणी फाउंडेशनने सामावून घेतलं आहे. पाणी फाउंडेशन सारख्या ज्या ज्या संस्था असतील त्यांना सोबत घेऊन आताही काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. यावेळी जलयुक्त शिवार ही योजना पुन्हा कार्यन्वित करण्याची घोषणा फडणवीसांनी केली. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जलयुक्त शिवार योजना 25 हजार गावांमध्ये ही योजना राबवण्यात येईल. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेस 3 वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय

Kandivali Crime News : गुजराती अभिनेत्रींच्या मुलाने 57 व्या मजल्यावरून उडी घेत स्वतःचे जीवन संपवले

Chhatrapati Sambhajinagar : शालेय पोषण आहारात नव्या मेनूची सुरुवात; विद्यार्थ्यांना मिळणार चविष्ट आहार