महाराष्ट्र

सांगली | दुष्काळी जत तालुक्यातील महिलांचे जयंत पाटलांसोबत रक्षाबंधन

Published by : Lokshahi News

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला ६ टीएमसी पाणी दिल्याने तालुक्यातील महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना राखी बांधत औक्षण केले आहे. दरम्यान, हा क्षण माझ्यासाठी फार भावनिक असून या भगिनींनी दिलेल्या प्रेमाबद्दल जयंत पाटील यांनी त्यांचे आभार मानले.

गेली अनेक वर्षे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्याची ६५ गावे पाण्यापासून पूर्णपणे वंचित होती. या गावांना कायमस्वरुपी सिंचनाखाली आणण्यासाठी ६ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मागच्या आठवड्यात जयंत पाटील यांनी घेतला.

जत तालुक्याला दुष्काळमुक्त करण्याच्यादृष्टीने जयंत पाटील यांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलल्याने तालुक्यातील जनता समाधानी आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा