महाराष्ट्र

सांगली | दुष्काळी जत तालुक्यातील महिलांचे जयंत पाटलांसोबत रक्षाबंधन

Published by : Lokshahi News

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला ६ टीएमसी पाणी दिल्याने तालुक्यातील महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना राखी बांधत औक्षण केले आहे. दरम्यान, हा क्षण माझ्यासाठी फार भावनिक असून या भगिनींनी दिलेल्या प्रेमाबद्दल जयंत पाटील यांनी त्यांचे आभार मानले.

गेली अनेक वर्षे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्याची ६५ गावे पाण्यापासून पूर्णपणे वंचित होती. या गावांना कायमस्वरुपी सिंचनाखाली आणण्यासाठी ६ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मागच्या आठवड्यात जयंत पाटील यांनी घेतला.

जत तालुक्याला दुष्काळमुक्त करण्याच्यादृष्टीने जयंत पाटील यांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलल्याने तालुक्यातील जनता समाधानी आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा