महाराष्ट्र

‘फडणवीस रोज पहाटे ४ वाजता राज्यपालांना फोन करतात’….

Published by : Lokshahi News

कॉमेडिअन कुणाल कामरा हा नेहमी आपल्या हटके वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. कुणालनं आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून टोमणा लगावला आहे. फडणवीस दररोज पहाटे ४ वाजता उठून तयार होऊन राज्यपालांना फोन करतात, असा टोला कुणालनं लगावला आहे.

'जर तुम्हाला आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये अपयश येत आहे, असं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की, देवेंद्र फडणवीस रोज पहाटे ४ वाजता उठून तयार होतात आणि राज्यपालांना फोन करून विचारतात, मी पुन्हा येऊ का', असं खोचक टि्वट कुणाल कामरानं केलं आहे.

राज्यातील सत्तास्थापनेचा संदर्भ देत कुणालनं हे टि्वट केलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहाटे राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. अवघ्या काही दिवसात अजित पवारांनी आपला पाठिंबा काढून घेतला आणि फडणवीसांनी राजीनामा दिला. याचाच संदर्भ देत कुणालनं फडणवीसांना टोला लगावला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Wardha Crime : शिक्षणासाठी पैसे नसल्याने 17 वर्षीय तरुणीने नैराश्यातून जीवन संपवले

Panchayat Season 5 : प्रेक्षकांना बघायला मिळणार आजी-माजी सरपंचांची लढाई; पुढील वर्षात येणार पंचायत 5 सीझन

Jitendra Awhad On Ashish Shelar : आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया म्हणाले, "मराठी माणसाची तुलना पहलगामच्या घटनेशी.."

Shivsena : "राज ठाकरेंच्या विरोधात नाही, पण उद्धव ठाकरे..." शिंदेंच्या शिवसेनेकडून विजयी मेळाव्यावर मोठ वक्तव्य