Aurangabad team lokshahi
महाराष्ट्र

'लोकशाही'चा ऑनलाइन सर्व्हे : औरंगाबादकरांना पाणी हवेच पण नामांतरावरही...

सोशल मीडियातून हजारो लोकांनी व्यक्त केले मत

Published by : Shweta Chavan-Zagade

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद (Aurangabad) शहरात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. औरंगाबादेतील अनेक भागात आठ-आठ दिवस पाणी येत नाही. जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही औरंगाबादकरांना पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नाही. तर दुसरीकडे औरंगाबादचं संभाजीनगर (Sambhajinagar) नामकरण करण्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगलंय. अशातच शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (8 मे) औरंगाबादेत स्वाभिमान सभा होणार आहे. यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न ''लोकशाही''ने केला. त्यानुसार औरंगाबादकरांना नामांतर नकोय तर पाणी हवंय, असे उत्तर आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ८ जून रोजी औरंगाबादमध्ये सभा, औरंगाबादकरांना काय हवं? पाणी की नामकरण (संभाजीनगर)? असा सर्व्हे लोकशाहीकडून करण्यात आला होता. यामध्ये लोकशाही यूट्यूब वर (https://www.youtube.com/c/lokshahinews​) विचारलेल्या प्रश्नावर हजारो नागरिकांनी मत नोंदवली. यामध्ये 68 टक्के नागरिकांनी औरंगाबाद शहरात पाणी हवंय म्हटले आहे. तर 32 टक्के नागरिकांनी औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे संभाजीनगर नामांतर झाले पाहिजे असे म्हटले आहे.

नामांतरही महत्वाचा

औरंगाबादकरांचा जिव्हाळ्याचा विषय पाणीच आहे. परंतु नामांतराचा मुद्दाही अनेकांना महत्वाचा वाटत आहे. तब्बल 32 टक्के नागरिकांनी पाण्यापेक्षा नामांतरला महत्व दिले आहे. यामुळे आज मुख्यमंज्ञी उद्धव ठाकरे काय घोषणा करतील, याकडे लक्ष लागले आहे.

तर लोकशाहीच्या ट्विटर (https://twitter.com/news_lokshahi) 81.8 टक्के नागरिकांनी औरंगाबाद शहरात पाणी हवंय असे म्हटले आहे. तर 18.2 टक्के नागरिकांनी औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे संभाजीनगर नामांतर झाले पाहिजे असे म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य

Home Loan Intrest Rate : गृहकर्जदारांना दिलासा ! PNB, Indian Bank आणि Bank Of India ने केली व्याजदरात कपात

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'