राजकारण

सरकार नेमके कुणाचे जनरल डायर का भाजपाचे? आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल

जालना घटनेचं पडसाद राज्यभरात उमटत असून राज्याचे राजकारणही चांगलेच तापले आहे. अशातच, आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचे पडसाद राज्यभरात उमटत असून राज्याचे राजकारणही चांगलेच तापले आहे. राज्यभरात आज मविआकडून आंदोलने करण्यात येत आहेत. अशातच, आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. खोके सरकारने आता राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे.

आपण सर्वांनी ती घटना टीव्हीवर पहिली आहे. हा लाठीचार मुद्दामहून केला आहे. मी दोन वर्ष मुख्यमंत्री यांचे कार्यालय जवळून पाहिले आहे. त्यांच्या आदेशाशिवाय लाठीचार्ज होऊच शकत नाही. या खोके सरकारने आता राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. तसेच, हे सरकार कुणाचे आहे नेमके जनरल डायर का भाजपाचे, असा खोचक सवालही त्यांनी विचारला आहे.

या सरकारला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काही राहिले नाही. हे सरकार बिल्डरांचे आहे. ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस मी स्वतः राज्याचा दौरा केला होता. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, असेही आदित्य ठाकरेंनी म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा