राजकारण

उध्दव ठाकरेंना एकटं पाडण्याचा गद्दारांचा कट; आदित्य ठाकरेंचा आरोप

Aditya Thackeray यांची निष्ठायात्रा कोल्हापुरात: शिंदे गटावर सडकून टीका

Published by : Team Lokshahi

मुंबई : बंडखोरांचे खरे चेहरे दिसू लागले आहेत. शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) व ठाकरे कुटुंबाला एकटं पाडण्याचा गद्दारांचा प्रयत्न आहे, असा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर शरसंधान साधले. ते आज कोल्हापूरमध्ये बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, सगळीकडून शिवसैनिकांचं प्रेम मिळतं आहे. लोकांना गद्दारी पसंत नाही. प्रत्येकजण म्हणतोय आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर आहे. सर्व शिवसैनिक उद्भव ठाकरेंसोबत आहेत. उध्दव ठाकरे व ठाकरे कुटुंबाला एकटं पाडण्याचा गद्दारांचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. परंतु, राज्यातील जनता आमच्या पाठीशी आहे. लोक आम्हाला एकटं पाडू देणार नाहीत. बंडखोरांचे खरे चेहरे दिसू लागले आहेत. हे गद्दारांचं सरकार कोसळणारच, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

ठाकरे सरकारनं केलेली कामं रखडली. दिलेल्या निधीला स्थगिती मिळणे ही महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. या सरकारचा शपथविधी बेकायदेशीर आहे. पुढील अडीच वर्षांत ते सर्व खापर आमच्यावर फोडतील, असा टोला त्यांनी लगवला.

शिवसेनेला एकटे पडण्याचा कट हे गद्दार करत होते. आता कोणताही राजकीय पक्ष खुश नाही. 2 लोकांचे जम्बो कॅबिनेट आहे. इतके दिवस तिसरा माणूस मिळाला नाही त्यामुळं खरा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न आहे, अशीही टीका त्यांनी शिंदे सरकारवर केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा