राजकारण

हिंमत असेल तर 40 गद्दारांच्या मतदारसंघात निवडणुका घ्या; आदित्य ठाकरेंचे आव्हान

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई: भाजपच्या बालेकिल्ल्यात नागपूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झाले आहेत. कोकणातून भाजप समर्थित उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. तर, बहुचर्चित नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणुकीत हार-जीत असते. पण, हिंमत असेल तर विधानसभा निवडणुका, पालिका निवडणुका घ्या. लवकरात लवकर निवडणूक लावावी. आता मुख्य गोष्ट ही आहे की हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरे यावं. 40 गद्दारांच्या मतदारसंघात निवडणुका घ्या, असे आव्हान आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहे.

आपल्या राज्यात, देशात आणि आपले मुंबईमध्ये लोकशाही आहे की नाही हा विचार आता मनात येईल. कारण जसं एक आपण बघताय की महापालिकेत असे हुकूमशाहीचं वातावरण आहे. या राज्यात देखील तसेच सुरू आहे. महत्वाची गोष्ट हीच राहते की आपले मुंबईमध्ये जी जगभरात तुम्ही ओळखली जाते. मुंबई म्हणून आपण सगळे मुंबईकर म्हणून ओळखले जातो. त्या मुंबईची ओळख आता अशी होत चालले की इथे एक वर्ष महानगरपालिकेत कोणाची सत्ता नसताना प्रशासक आणि जे काही प्रशासन आहे ते अंदाधुंद कारभार चालवत आहे आणि मुंबईकरांचा पैसा याचा चुराडा करत आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, आजचा निकाल म्हणजे सत्ताधारी पक्षाला चपराक आहे. पदवीधर आणि शिक्षक हा दोन्ही वर्ग आमच्या पाठीशी आहेत. नागपूर सारखी जागा देखील अडचणीत आलेली आहे. कोकणचे उमेदवार जरी जिंकले असतील तरी ते शिवसेनेचेच होते. कोकणचे जिंकलेली उमेदवार उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे होते. सत्यजित तांबे हे काँग्रेस पक्षाचे युवकांचे अध्यक्ष होते. तांब्यांचे अख्ख घराणं काँग्रेसचच आहे. सत्यजित तांबेच निवडून येतील, असे अजित पवार यांनी म्हंटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : लालबागचा राजा गिरगावमध्ये दाखल

Rain Alert : आज देशभरात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी

Lunar Eclipse 2025 : भारतात आज दिसणार खग्रास चंद्रग्रहण

Latest Marathi News Update live : अनंत चतुर्दशीनिमित्त पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर आज घरगुती बापांचा विसर्जन संपन्न