राजकारण

...म्हणून मी आजचा निर्णय घेतलाय; काय म्हणाले अजित पवार?

पुण्यातील रामकृष्ण मोरे सभागृहात सहकार क्षेत्राच्या वेबपोर्टलचे उद्घाटन केंद्रीयमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी अजित पवारांनी मोदी-शहा यांचे कौतुक केले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : शाहू, फुलेंच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं भलं फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहाच करू शकतात, असे शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटले आहे. पुण्यातील रामकृष्ण मोरे सभागृहात सहकार क्षेत्राच्या वेबपोर्टलचे उद्घाटन केंद्रीयमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 

अजित पवार म्हणाले की, अमित शाह गुजरातचे असले तरी जास्त प्रेम महाराष्ट्रावर आहे कारण ते महाराष्ट्रचे जावई आहेत. केंद्रात सहकार विभाग निर्माण करण्यासाठी आम्ही 22 वर्ष प्रयत्न करत होतो. कोणी ही डेरिंग केलं नाही. हे डेरिंग फक्त अमित भाईंनी दाखवलं. म्हणूनच आज सहकार क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे.

अजित पवारांनी असं का केलं, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचं कारण हेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह फक्त हे दोघेच देशाचं नेतृत्व करू शकतात, असे अजित पवारांनी बंडाचे कारण सांगितले आहे. तसेच, शाहू, फुलेंच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं भलं फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीचं करू शकतात, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा