राजकारण

बैठकीत पंचपक्वानाचा मेन्यू ठेवून...; अमेय खोपकरांची जोरदार टीका

'इंडिया' आघाडीच्या बैठकीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी मराठमोळ्या खाद्यपदार्थांचं आयोजन करण्यात आले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

'इंडिया' आघाडीच्या बैठकीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी मराठमोळ्या खाद्यपदार्थांचं आयोजन करण्यात आले आहे. नाश्ता, लंच, डिनर, प्रत्येक ठिकाणी मराठमोळे खाद्यपदार्थ ठेवण्यात आले आहेत. यावरुन आता मनसेच्या अमेय खोपकर यांनी जोरदार टीका केली आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, राज्यात ३ आठवड्यांपासून पाऊस गडप झालाय. बळीराजाची चिंता वाढलेली आहे. दुष्काळाचं संकट गहिरं होतंय. मविआ नेते एकीकडे राज्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करतायत आणि दुसरीकडे I.N.D.I.Aआघाडी बैठकीआधी राज्याच्या राजधानीत पुरणपोळी, करंजी, मोदक अशा पंचपक्वान्नाच्या पंगती उठतायत.शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना या नेत्यांना लाजही वाटत नाही.

तसेच सत्तापिपासू नेत्यांच्या या भाऊगर्दीत जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा एकच पक्ष आहे आणि मी अशा मनसे पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे याचा मला अभिमान आहे. असे मिटकरी म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसेच्या मोर्चाआधी पोलिसांनी अविनाश जाधव यांना घेतलं ताब्यात

Latest Marathi News Update live : पुण्यात एसटी थांबवून ठेवल्यानं वारकऱ्यांचा संताप

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना नोकरीत खुशखबर मिळण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार