Anandraj Ambedkar Team Lokshahi
राजकारण

रिपाइं ऐक्यावर माझा विश्वास नाही, आनंदराज आंबेडकरांचे विधान

आनंदराज आंबेडकर हे पहिल्यांदाच अमरावतीमध्ये आले होते. शहरातील विविध सामाजिक संघटनांनी त्यांचे शासकीय विश्रामगृह येथे भेटी घेत स्वागत केले

Published by : Sagar Pradhan

रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे आज अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. कार्यक्रम पार पडल्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत घेत रिपाइं ऐक्याच्या विषयावर रोखठोक विधान केले आहे. रिपाइं ऐक्यावर माझा विश्वास नाही. ही शुद्ध फसवणूक आहे. कारण घोडे, गाढव हे एकाच ठिकाणी एकत्र आणणे, हे अशक्य आहे. अशा शब्दात रिपाइं ऐक्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले आनंदराज आंबेडकर?

रविवारी अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, रिपाइं ऐक्याचे यापूर्वी अनेकवेळा प्रयोग करण्यात आले. परंतु, या ऐक्यावर माझा विश्वास नाही. ही शुद्ध फसवणूक आहे. कारण घोडे, गाढव हे एकाच ठिकाणी एकत्र आणणे, हे अशक्य आहे. नेत्यांना एकत्र आणण्यापेक्षा समाजाला एका जागी आणण्यावर माझा विश्वास आहे. असे मत त्यांनी यावेळी मांडले.

पुढे ते म्हणाले की, सध्या देशात अघोषित आणीबाणी आहे. सध्याचे सत्ताधारी हे सत्ता टिकविण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहेत. शासकीय यंत्रणेचा चुकीचा वापर करून ते विरोधकांना अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारला विरोध करणारे हे देशद्रोही अशी वागणूक सध्या देशात विरोधकांना मिळत आहे. बाबासाहेबांच्या धर्मांतराला विरोध करण्यासाठी आमच्याच मंडळींचा वापर ते करीत असल्याचे सांगत त्यांनी रामदास आठवले यांच्या विधानावर भाष्य केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?