Imtiyaz Jaleel Team Lokshahi
राजकारण

'माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला आणि मी औरंगाबादमध्येच मरणार' नामांतराला जलील यांचा कडाडून विरोध

नाव बदलून शहराची परिस्थितीत बदलणार आहे का? लोकांना दररोज पाणी, चांगले रस्ते, आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा मिळणार आहेत का?

Published by : Sagar Pradhan

केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराला अखेर मंजुरी दिली. हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून केंद्र सरकारकडे प्रलंबित होता. या केंद्र सरकारच्या निर्णयाचे आता सर्वांकडून स्वागत होत आहे. तर दुसरीकडे यावरून आता श्रेयवादासह आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे. याच नामांतराविरोधात औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. त्यावरच आता पुन्हा एकदा जलील यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले इम्तियाज जलील?

नाव बदलली जातील, बोर्ड बदलतील पण इतिहास कसा बदलाल? इतिहास कधीच मिटवता येत नाही. ज्या शहरात माझा जन्म झाला ते औरंगाबाद शहर जगाच्या नकाशावर एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. काहीजण औरंगाबादचे नामांतर केल्यानंतर उड्या मारत आहेत. पण, माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला आणि मी औरंगाबादमध्येच मरणार. अस ठामपणे जलील यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, नाव बदलून शहराची परिस्थितीत बदलणार आहे का? लोकांना दररोज पाणी, चांगले रस्ते, आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा मिळणार आहेत का? असे रोखठोक सवाल त्यांनी केला. त्यामुळे आमचा शहराच्या नामांतराला विरोधच राहील, असे इम्तियाज जलील यांनी दोनदा स्पष्टपणे सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा