राजकारण

अविनाश जाधवांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी टोलवर भाष्य केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी टोलवर भाष्य केलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम आहे. सगळ्या सरकारने टोलमुक्तीच्या फक्त थापा मारल्या. फडणवीस टोलवरुन धादांत खोटं बोलतात. टोलचा पैसा जातो कुठे? प्रत्येक टोलनाक्यावर मनसैनिक उभे राहतील. लहान वाहनांकडून टोल घेतल्यास टोलनाका जाळून टाकू. असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

राज ठाकरेंनी असा इशारा दिल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसैनिक पनवेल, मुलुंडच्या टोलनाक्यावर हजर झाले आहेत. टोल न भरताच चारचाकी वाहनं मनसेकडून सोडण्यात येत होती. अविनाश जाधव यांनी मुंबईतील मुलुंड टोलनाक्यावर धाव घेत आंदोलन सुरु केलं. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात मनसेचं आंदोलन सुरु होते. देवेंद्र फडणवीसांचा जुना व्हिडीओ दाखवत मनसैनिकांकडून वाहनं विनाटोल सोडण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता अविनाश जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा