राजकारण

अजित दादांच्या अर्थमंत्रीपदावरून बच्चू कडूंची सकाळी नाराजी, दुपारी घुमजाव

अजितदादांच्या एन्ट्रीने मी नाराज नाही, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी सकाळी केले, तर दुपारी घुमजाव केला.अजितदादांच्या अर्थमंत्रीपदावरुन बच्चू कडूंनी भूमिका काही तासांतच बदलली.

Published by : Team Lokshahi

नागपूर :अजितदादांच्या एन्ट्रीने मी नाराज नाही, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी सकाळी केले, तर दुपारी घुमजाव केला.अजितदादांच्या अर्थमंत्रीपदावरुन बच्चू कडूंनी भूमिका काही तासांतच बदलली.

काय म्हणाले बच्चू कडू

  1. अजितदादांच्या एन्ट्रीने मी नाराज नाही

  2. राजकारणात अनेकदा पेच होत असतो

  3. दादा आले तर दादागिरीने सरकार चालेल

  4. तीन इंजिनमुळे सरकार जास्त मजबूत

  5. तीन तिगाडा होऊ नये अशी काळजी घ्यायला हवी

  6. दिल्लीतील नेते यातून मार्ग काढणार

  7. अजितदादांकडे अर्थखाते आलं तर चांगलंच

  8. अधिक तेढ निर्माण होऊ नये दादांनी काळजी घ्यावी

  9. अचानक वादळ सत्तेत घुसलंय

  10. आता सत्ता एके सत्तेचा फळा पाहायला मिळतोय

  11. आता सगळेच बेरजेचं राजकारण करतात

मी कार्यकर्त्यांची बैठक लावलेली आहे, त्यामुळे मी परत आलेलो आहे. मुंबईत राहिलो तर मंत्रीपद मिळतं असं नाही आहे. अजितदादा पवार यांना अर्थमंत्री पद मिळावं, अशी आमची इच्छा नाही आहे. कारण मागच्या वेळेस त्यांनी जे केलं, त्यामुळे त्यांना अर्थमंत्रीपद मिळू नये अशी आमची इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री यांची रात्री काल बैठक झाली, बैठका आता होणारच आहेत, काम करत असाल तर बैठका घ्याव्या लागतात, असे बच्चू कडू म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू