राजकारण

Bacchu Kadu : 4 नोव्हेंबरला पूर्ण चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. बच्चू कडू म्हणाले की, महायुती आणि महाविकास आघाडी यांना लोक कंटाळली आहेत. प्रचंड आम्हाला फोन येत आहेत. दोन्ही पक्षातील आघाडी आणि युतीतील लोकांच्या अंतर्गत मारामारी आहे.

चांगल्या उमेदवाराला डावलण्याचा जो प्रयत्न होत आहे. त्याचा फायदा निश्चितच महाशक्तीला होईल. दुसरं जनतेला आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. दोघंही धर्म आणि जातीचे मुद्दे घेऊनच लोकांची आतापर्यंत मत घेत आलीत.

4 तारखेला पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट होईल. तुम्हाला वाटेल की, हा कसा काय महाशक्तीमध्ये आला. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच पिक्चर क्लिअर होईल. विदर्भात चांगले उमेदवार आणि चांगले मतदार संघ आमच्याकडे आलेले दिसणार.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, उमेदवारांच्या ताकदीपेक्षा राजकारण महत्त्वाचा असते. माझ्या मतदारसंघातील लोकांचा जोपर्यंत माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी तिथूनच लढणार. असे बच्चू कडू म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा