राजकारण

राजकारणात कायम कोणी नाराज नसतं : बच्चू कडू

नाराजीच्या चर्चा देवेंद्र फडणवीसांनी चर्चा फेटाळून लावल्यानंतर आता बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पालघर : सलग दोन दिवस वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर छापलेल्या जाहिराती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. यावरुन सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी टीकेची तोफ डागली आहे. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. देवेंद्र फडणवीसांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. यावर आता मंत्री बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात कायम कोणी नाराज नसतं, असे त्यांनी म्हंटले आहे.

जाहिरातीच्या मुद्यावर तांडव करण्यापेक्षा इतर मुद्दे आहेत. खर तर असे मुद्दे थांबले पाहिजे. नको त्या गोष्टी नको व्हायला. राजकारणात कायम कोणी नाराज नसतं. सोयी सोयीनुसार नाराजी असते. राजकारण हे विकासाचं झालं पाहिजे. फडणवीस यांचे काम पाहा. नाक कान पाहू नका त्यांच काम मोठं आहे, असे बच्चू कडूंनी म्हंटले आहे.

शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे अद्यापही अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील आसेगाव आणि तळेगाव मोहना या दोन मंडळांना अतिवृष्टीचा निधी प्राप्त होऊ शकला नाही. याविरोधात बच्चू कडू यांनी थेट सचिवालयात बेमुदत उपोषणाचा शासनाला इशारा दिला होता. याबाबत सांगताना ते म्हणाले, आज मी उपोषणाची नोटीस दिली होती. माझ्या मतदार संघात नुकसान झालं पण व्यवस्थित मदत मिळाली नाही. नियम डावलून तिथं काम केले जात होतं. काम होत नव्हतं म्हणून उपोषणासाठी नोटीस दिली. परंतु, आम्हाला आता न्याय मिळाला जी मागणी होती ती पूर्ण झाली सर्वांचे आभार, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जाहिरात नाट्यावर पहिल्यादांच फडणवीसांनी प्रतिक्रिया जाहिरपणे दिली आहे. आम्ही आजही एकत्र आणि उद्याही सोबत असू. आमचा 25 वर्षांपासून एकत्र प्रवास आहे, पण गेल्यावर्षभरात तो अधिक घट्ट आहे. एका जाहिरातीमुळे सरकारला काहीही होणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा