Bachhu Kadu  Team Lokshahi
राजकारण

बच्चू कडूंनी व्यक्त केली मुख्यमंत्री होण्याची इच्छा; म्हणाले, आमचं पण राजकारण...

अमरावतीत एका अभ्यासिकेच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना बच्चू कडूंनी व्यक्त केली इच्छा.

Published by : Sagar Pradhan

सूरज दाहाट।अमरावती: राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यातच कुठल्या ना कुठल्या कारणावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक वाद रंगल्याचे दिसून येते. ह्या सर्व गोंधळादरम्यान, नेहमी आपल्या विधानाने चर्चेत राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे. अमरावतीत एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

प्रहार हा आपल्या अमरावतीचा पक्ष आहे. हा काय दिल्ली- मुंबई वाल्यांचा थोडी पक्ष आहे, आपल्या मातीतला आपण निर्माण केलेला पक्ष आहे. लोक आम्हाला म्हणता गद्दारी का केली, मी त्यांना म्हणतो, आम्ही कुठे गद्दारी केली आमचा स्वतंत्र पक्ष आहे. आम्ही कुठेही जाऊ शकतो. आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे. आमचं पण राजकारण आहे. असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरती प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आज विशेष ब्लॉक, 'या' वेळेत राहणार वाहतूक बंद?

New Delhi : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन

Amol Mitkari : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते...; अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती, अमोल मिटकरींचा दमानियांना टोला

Pandharpur Rain Update : पंढरपूरला पूरसदृश परिस्थिती; चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली