Rahul Gandhi  Team Lokshahi
राजकारण

काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल, मशाल ठरली केंद्रस्थानी

नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14 दिवस ही यात्रा

Published by : Sagar Pradhan

सध्या देशभरात काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सुरु आहे. राहुल गांधींच्या नेत्तृत्वात ही आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. आज नांदेडमधील देगलूर या ठिकाणी ही पदयात्रा पोहोचली आहे. यावेळी राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या हाती मशाली घेतल्या होत्या. त्यांनतर देगलूर नाक्यावर ही मशाल यात्रा आल्यानंतर राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

यावेळी राहुल गांधी यांना पाहण्यासाठी सामान्य नागरिकांसह कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. बॅनर, झेंडे आणि राहुल गांधी यांची प्रतिमा हाती घेत नागरिकांनी यात्रेला हजेरी लावली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14 दिवस ही यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. अकोला जिल्ह्यातील यात्रा मार्गांवर राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत. काँग्रेसच्या या यात्रेत अनेक सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा