राजकारण

विधानसभेच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले भास्कर जाधव; म्हणाले, हक्काची संधीसुद्धा...

राज्यात सत्तांतरानंतर यंदाचे शिंदे-फडणवीसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच गाजले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

निस्सार शेख | रत्नागिरी : राज्यात सत्तांतरानंतर यंदाचे शिंदे-फडणवीसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच गाजले आहे. सभागृहामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी विधानसभेत आक्रमकपणे बाजू मांडत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. परंतु, अद्याप अधिवेशन संपण्यास तीन दिवस बाकी असूनही भास्कर जाधव यांनी सभागृह सोडले आहे. या अधिवेशनात जाणीवपूर्वक माझी हक्काची संधी वारंवार डावलण्यात आली, असा आरोपही त्यांनी जाताना केला आहे.

भास्कर जाधव म्हणाले की, विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत उपस्थित राहून कोकणासह राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा फोडून ते सोडविण्याचा माझा प्रयत्न असतो. विधानसभा हे संसदीय लोकशाहीचं असं एक सभागृह आहे जिथे अनेक प्रश्नांना न्याय मिळवून देता येतो व त्यासाठी माझा कायम संघर्ष असतो, हेदेखील आपण सर्वजण जाणता. उठावदार कामगिरी करून समाधानाने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या पायऱ्यांना नमस्कार करूनच मी बाहेर पडतो. ही माझी कित्येक वर्षांपासूनची प्रथा आहे. या अधिवेशनात मात्र जाणीवपूर्वक माझी हक्काची संधीसुद्धा वारंवार डावलण्यात आली. त्यामुळे अधिवेशन संपायला तीन दिवस असतानाही आज अत्यंत विषण्ण मनाने विधानभवनातून बाहेर पडावं लागलं, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा