Ashish Shelar | Sanjay Raut Team Lokshahi
राजकारण

शेलारांची राऊतांवर सडकून टीका; म्हणाले, आपल्या आवकातीत ...

ज्या संजय राऊत यांनी एकही कधी निवडणूक लढवली नाही. ते आता भाजपवर आणि शिंदे गटावर टीका करत असल्याचे शेलार म्हटले.

Published by : Sagar Pradhan

नुकताच निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह दिले. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या निर्णयामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटात आता वाद आणखीच तीव्र झाला आहे. सोबतच या निर्णयावरून ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी भाजप आणि न्यायपालिकेवर टीका केली होती. त्यानंतर आता शिंदे गट आणि भाजपनेही राऊतांना उत्तर दिले आहे. राऊतांच्या याच टीकेचा आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील समाचार घेतला आहे.

काय म्हणाले आशिष शेलार?

राऊतांच्या टीकेवर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, ज्या संजय राऊत यांनी एकही कधी निवडणूक लढवली नाही. ते आता भाजपवर आणि शिंदे गटावर टीका करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपवर आणि शिंदे गटावर टीका करताना संजंय राऊत यांनी आपल्या आवकातीत रहावे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री पदासाठी आणि सत्तेसाठी त्यांनी हिदुत्व सोडले होते. असा निशाणा त्यांनी यावेळी साधला आहे.

पुढे ते म्हणाले की, शिंदे गटाला ज्याप्रमाणे त्यांनी न्यायालयात खेचले होते, त्याचप्रमाणे ठाकरे कुटुंबीयांनी आपल्या परिवारालाही त्यांनी पैशासाठी न्यायालयात खेचले होते अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. संजय राऊत सध्या ज्या प्रमाणे आता बोलत आहेत. ज्या प्रकारे टीका करत आहेत. त्याच प्रमाणे त्यांनी या गोष्टी उद्धव ठाकरे यांना न्यायालयात सांगावे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. त्यामुळे आता संजय राऊत आणि भाजप असा सामना पुन्हा एकदा बघायला मिळणार असे देखील त्यांनी स्प्ष्टपणे सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान