Sharad Pawar | Gopichand Padalkar Team Lokshahi
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नसून टोळी, आज ना उद्या संपणार : गोपीचंद पडळकर

गोपीचंद पडळकरांनी केली राष्ट्रवादी आणि अजित पवारांवर टीकास्त्र

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संजय देसाई | सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष नसून एक टोळी आहे आणि तो आज ना उद्या संपेल, अशी घणाघाती टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच, महाराष्ट्रात काय चाललंय त्यापेक्षा आपल्या मतदारसंघात काय चाललंय हे बघावं, असा टोलाही पडळकर यांनी अजित पवारांना लगावला आहे. सांगलीच्या विटा या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ स्थापनेपासून एकच राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि तो आजपर्यंत बदलला गेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कोणत्याही प्रकारचा अजेंडा देखील नाही आणि हा पक्ष फुटणार नाही. कारण तो आज ना उद्या संपणार आहे, अशा शब्दात पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर निशाणा साधला आहे.

तसेच, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपण लाखाच्या मताने बारामती मधून निवडून येतो. या केलेल्या विधानाचा समाचार घेताना, लाखांच्या मताने निवडून येत असाल तर बारामती तालुक्यातील 44 गाव हे पाण्यापासून वंचित का आहेत? दुष्काळ सुरू झाला की महाराष्ट्रातून या गावांची पाण्याची टँकर देण्याची पहिली मागणी असते. याचा आधी विचार अजित पवारांनी केला पाहिजे आणि महाराष्ट्रात काय चाललंय त्यापेक्षा आपल्या मतदारसंघात काय चाललंय हे बघावं, असा टोलाही पडळकर यांनी अजित पवारांना लगावला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा