Mahavikas Aghadi  Team Lokshahi
राजकारण

महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात काय केले? पंतप्रधानांच्या टीकेनंतर भाजपच्या आणखी एक मंत्र्यांचा सवाल

शिंदे-फडणवीसांचे डबल इंजिन सरकार सहा महिन्यांपुर्वी सत्तेवर आले आणि रखडलेल्या सगळ्या महत्वाच्या, विशेषतः मुंबईकरांच्या प्रकल्पांना मंजुरी देत कामे सुरू केली.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. परंतु, त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सत्तातरानंतर पहिल्यांदा मुंबईत आले. यावेळी त्यांच्या या दौऱ्याची भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. यावेळी आज त्यांच्याकडून अनेक विकास कामांचे देखील लोकार्पण करण्यात आले. परंतु, बीकेसी येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यावरच भाजप मंत्री अतुल सावे यांनी मोठा दावा केला आहे.

नेमकं काय केला सावेंनी दावा?

राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात काय केले? हे जनतेसमोर मांडावे, आमचे सरकार आल्यानंतर सहा महिन्यात आम्ही कोणते निर्णय घेतले हे सांगितले आहे? शिंदे-फडणवीस यांचे डबल इंजिनचे सरकार आल्यावर राज्यातील विकासकामांना वेग आल्याचा दावा सावे यांनी केला.

महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्ष सत्तेवर होते, पण त्यांच्या काळात विकासकामे पुर्णपणे ठप्प होती. काय केले हे सांगण्यासारखे नसल्यामुळेच महाविकास आघाडी आपले रिपोर्ट कार्ड जनतेसमोर सादर करू शकली नाही.

शिंदे-फडणवीसांचे डबल इंजिन सरकार सहा महिन्यांपुर्वी सत्तेवर आले आणि रखडलेल्या सगळ्या महत्वाच्या, विशेषतः मुंबईकरांच्या प्रकल्पांना मंजुरी देत कामे सुरू केली. सहा महिन्यात आमच्या सरकारने काय केले याचे रिपोर्ट कार्ड आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत. मुंबई आणि राज्याचा विकास शिंदे-फडणवीस सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करू शकतात, असा दावा देखील सावे यांनी केला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा