Atul Bhatkhalkar Team Lokshahi
राजकारण

काँग्रेसने देशाची माफी मागावी; का केली भातखळकरांनी अशी मागणी?

हा तुम्ही केलेला तिरंग्याचा सन्मान होय रे गुलामांनो. काँग्रेसने देशाची माफी मागावी.

Published by : Sagar Pradhan

काँग्रेस नेते राहुल गांधीं यांच्या नेत्तृत्वात पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगरमध्ये समारोप झाला. श्रीनगरच्या शेर-ए- कश्मीर मैदानात सभा घेऊन यात्रेचा समारोप झाला. त्याआधी काल काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ध्वज फडकवन्यात आला. मात्र, याच कार्यक्रमात राहुल गांधी यांचे मोठे कट आऊट लावण्यात आले होते. याच कट आऊटवर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेतला आहे.

काय म्हणाले अतुल भातखळकर?

राहुल गांधी यांनी काल श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप केला. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. याच कार्यक्रमात राष्ट्रध्वजापेक्षा मोठा राहुल गांधींचा फोटो होता. त्यावरच बोलताना भातखळकर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, तिरंग्यापेक्षा राहुल गांधींचा कट आऊट मोठा. हा तुम्ही केलेला तिरंग्याचा सन्मान होय रे गुलामांनो. काँग्रेसने देशाची माफी मागावी. अशी मागणी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा