राजकारण

...अन्यथा माझाही जय श्रीराम झाला असता : भाजप आमदार

मुंबईतील खड्डयांवरुन अधिवेशनात भाजप आमदारांचा सरकारला सवाल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पावसाचा पुन्हा एकदा जोर वाढल्याने मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्याही वाढली आहे. यामुळे अपघात वाढले असून अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहे. मुंबईतील बोरीवली येथील नॅशनल पार्कसमोर भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. यावर आज भाजप नेत्या मनिषा चौधरी यांनी अधिवेशनात सवाल उपस्थित केले.

बोरिवली येथील अपघातात काल दोन जणांचा मृत्यू झाला. मीही त्या रस्त्यांवरुन प्रवास करताना थोडक्यात बचावले अन्यथा माझेही जय श्रीराम झाले असते. या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे दिसत नाहीत. रस्ते व्यवस्थित नसताना आयआरबी कसला टोल वसुली करत आहेत. या कंपन्यांवर काय कारवाई करणार, असा सवालही त्यांनी विचारला.

दहीहंडीमुळे मोठ्या संख्येने गोविंदा पथके मुंबईत येणार आहेत. अशात रस्त्यांवरील खड्डयांमुळे अपघातांची शक्यता आहे. यामुळे तातडीने खड्डे भरण्याची गरज आहे, अशी मागणी मनिषा चौधरी यांनी केली आहे. दरम्यान, मनिषा चौधरी यांच्या प्रश्नावर लवकरच सर्व रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्याचे उत्तर शिंदे सरकारकडून सभागृहात देण्यात आले.

काय आहे प्रकरण?

बोरिवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर डंपरखाली येऊन एका तरुण जोडप्याचा बुधवारी दुर्दैवी मृत्यू झाला. हे जोडपे पश्चिम द्रुतगती महामार्गावरुन जात असताना बोरिवली नॅशनल पार्कसमोर असलेल्या खड्ड्यामध्ये त्यांच्या दुचाकीचं चाक अडकलं. यामुळे दोघेही दुचाकीवरुन खाली पडले. त्याचवेळी मागून भरधाव डंपरखाली आले. आणि या जोडप्याचा जागीच मृत्यू झाला

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Atal Setu : अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

Imran Khan : इम्रान खान यांना मोठा दिलासा; जामीन मंजूर