राजकारण

कोड नंबर देऊन नेत्यांच्या घरांवर हल्ले केले; भुजबळांचा गंभीर आरोप, वेळीच आवरलं असतं तर...

बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळीच्या घटनेवरुन छगन भुजबळ यांनी घणाघात केला असून गंभीर आरोप केले आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

जालना : बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळीच्या घटनेवरुन छगन भुजबळ यांनी घणाघात केला आहे. कोड नंबर देऊन नेत्यांच्या घरांवर हल्ले केले, असा थेट आरोप भुजबळांनी केला आहे. जालन्यात आज ओबीसी समाजाची जाहीर एल्गार महासभा झाली आहे. या सभेत ते बोलत होते.

प्रकाश सोळंकेंवर हल्ला करण्यासाठी पेट्रोल बॉम्ब होते. कोड नंबर देऊन नेत्यांच्या घरांवर हल्ले केले, असा आरोप भुजबळांनी केले आहेत. सरकारच्या लांगुलचालनामुळे आंदोलकांची हिंमत वाढली. वेळीच आवरलं असतं तर ही वेळ आली नसती, असे म्हणत त्यांनी सरकारलाही घरचा आहेर दिला आहे. स्वकीयांची घरं जाळायला तुम्हाला सांगितलं? असा सवालही भुजबळांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, या सभेतू विजय वडेट्टीवार यांनीही जोरदार टीका केली आहे. मोठ्या भावाने मोठ्या भावासारखं वागलं पाहिजे. लहान भावाच्या ताटातलं काढायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला तुमची जागा दिसल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर ठरवायचं असेल तर आपण सर्व मिळून या देशाच्या पंतप्रधानांना विनंती करायला जाऊ आणि सांगू एकदा जातनिहाय जनगणना करून टाका, असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ankita Lokhande and Vicky Jain: अंकिता लोखंडेच्या पती विकी जैनला अपघात; हातात काचांचे तुकडे रुतले, तब्बल 45 टाके

Latest Marathi News Update live : छ.संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याची उभारणी

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या शिबिरात जयंत पाटीलांची ठाम भूमिका; भारत-पाकिस्तान क्रिकेटवर आक्षेप

Sanjay Raut On Ajit Pawar : अजित पवारांवर संजय राऊतांचा घणाघात; भारत-पाक सामना प्रकरणावरून चांगलीच जुंपली