Nana Patole | Ajit Pawar Team Lokshahi
राजकारण

'मोदी हैं तो मुमकिन हैं' अजित पवार मुख्यमंत्री होण्यावरून नाना पटोलेंची प्रतिक्रिया

सत्तेचा माज राज्यात पाहायला मिळतं. चुकून पहिल्यांदा 105 भाजपचे आमदार निवडून पाठवले असं आता राज्यातील जनतेला वाटत असल्याचं पटोले म्हणाले.

Published by : Sagar Pradhan

उदय चक्रधर | भंडारा: राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरू आहे. त्यातच दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी राज्यातील राजकीय वातावरण काही दिवसांपूर्वी ढवळून निघाले. यानंतर एका मुलाखतीत अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपदाची त्यांच्या इच्छा उघड बोलून दाखवली. दरम्यान यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले नाना पटोले?

माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, मुमकिन हैं क्या नमकिन हैं आमचं देणं घेणं नाही. पुढच्या काळात यांचा सुपडा साफ झाला पाहिजे, तेव्हाच यांच्या सत्तेचा मस्ती आटोक्यात येईल, असं आता महाराष्ट्रातील जनतेला वाटू लागलं असल्याची खरमरीत प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. मोदी हैं तो मुमकिन हैं....! क्या अजित पवार मुख्यमंत्री बन सकते हैं!!! या प्रश्नांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अगदी खरमरीत प्रतिक्रिया देताना, आमचं याच्याशी काही देणं घेणं नाही. कारण महाराष्ट्रात जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत. शेतकरी, तरुण मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. महागाई मोठ्या प्रमाणत वाढत चाललेली आहे. हे महत्वाचे प्रश्न आहे. जनतेचे प्रश्न घेवून लढायच की खोक्यांच सरकार बनवायचं की, तानाशाहांचं सरकार बनवायचं... सत्तेचा माज राज्यात पाहायला मिळतं. चुकून पहिल्यांदा 105 भाजपचे आमदार निवडून पाठवले असं आता राज्यातील जनतेला वाटत असल्याचं पटोले म्हणाले.

पुढे पटोले यांनी बारसू रिफायनरीबाबत देखील भाष्य केले. ते म्हणाले की, बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत फडणवीस स्वतःचं राजकारण करीत असून महाराष्ट्राच्या विधानसभेत जेव्हा पत्रकाराच्या हत्येप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळेसच आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता. तुम्ही कोणत्याही योजना आणताना त्या भागात तुमचे बगलबच्चे जागा घेतात. आणि त्या बगलबच्च्यांना योजना दिल्या जातात. आमची भुमिका प्रकल्पाच्याविरोधात नसून सरकारने स्थानिक लोकांची आणि विरोधकांची भुमिका समाजून घेतली पाहीजे असा पलटवार नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसावर केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Janasuraksha Bill : विरोधकांच्या सभात्यागानंतरही विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर

Indian Coast Guard : अंदमान समुद्रात भारतीय तटरक्षक दलाची धाडसी कारवाई; 'Sea Angel' नौकेचे यशस्वी बचाव अभियान

Chhatrapati Sambhajinagar : धनगर विद्यार्थ्यांच्या शिक्षण योजनेत भ्रष्टाचार; दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Latest Marathi News Update live : जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेतही मंजूर