gulabrao patil Team Lokshahi
राजकारण

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, पाणी काय आकाशातून टाकू का?..

मला गुलाब भाऊ नाही तर पाणीवाला बाबा व्हायचे आहे

Published by : Sagar Pradhan

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री शिंदे गटाचे आमदार गुलाबराब पाटील हे कायम वेगवेगळ्या विधानाने चर्चेत असतात. मात्र, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर मंत्री गुलाबराव पाटील जास्त चर्चेत येत आहे. आता पुन्हा ते वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. पाणी टंचाईवर बोलत असताना गुलाबराव पाटील यांनी खळबळजनक विधान केले आहे. मंत्री पाटील यांच्या या विधानांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

धरणगाव एरंडोल तालुक्यांमध्ये पाणीपुरवठा होत नसल्यानं लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नदीला आलेल्या पुरामुळे पंप बंद झाले आहेत. यामुळे पंपामध्ये मोठा गाळ जमा झाला आहे.पुरामुळे ही तांत्रिक पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर पंपच बंद आहेत मग पाणी काय आकाशातून टाकू का?असे वादग्रस्त विधान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटल यांनी यावेळी केले आहे.

मला गुलाब भाऊ नाही तर पाणीवाला बाबा व्हायचे आहे. राज्यात अनेक पाणी पुरवठा योजना आणणार आहे. खात्यातर्फ चांगल्या योजना राबवल्या जातील. असे विधान मंत्री पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. मात्र, आजच्या विधानांवर पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांकडून प्रचंड विरोध केला जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद