राजकारण

संजय राऊतांना दिलासा नाहीच; पुन्हा 14 दिवसांची कोठडी

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आजही राऊतांना न्यायालयाचा दिलासा मिळालेला नसून कोठडीत आज पुन्हा वाढ झाली आहे. संजय राऊतांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे आता त्यांचा 19 सप्टेंबरपर्यंत तुरुंगाच मुक्काम असणार आहे.

मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना तीन वेळा कोठडी सुनावण्यात आली. आज त्यांची कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. दरम्यान, संजय राऊत यांना कोर्टाने आजही तब्बल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांचा 19 सप्टेंबर पर्यंत कोठडीत राहावं लागणार आहे.

काय आहे प्रकरण?

पत्राचाळ येथे म्हाडाचा भुखंड होता. हा भुखंड विकसित करण्यासाठी आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम दिले होते. पण त्यांनी ही जागा परस्पर खाजगी विकासकांना विकली. पत्राचाळमधील 672 रहिवाशींना 650 स्केअर फुटाचे घर देण्यात येणार होते. त्यांच्या या सोसायटीत अनेक अॅनिमिटी देण्यात येणार होत्या. रहिवाशांना 25 कोटी रुपये कार्पस फंड देण्यात येणार होते. त्यातून रहिवाश्यांचे मासिक मेंटेनेंस भरला जाणार होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : महाकुंभातील संगम आणि सरयू नदीचे पवित्र पाणी, राम मंदिराची प्रतिकृती; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या या खास भेटवस्तू

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Sandeep Deshpande : 'आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका....मेहता बिहता नी...'; संदीप देशपांडेंनी पुन्हा ठणकावलं, मराठी विरूद्ध गुजराती वाद उफाळला

Raj Thackeray - Uddhav Thackeray : 'ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या...'; 5 जूलैच्या विजयी मेळाव्यानिमित्त वरळीत बॅनरबाजी