Devendra Fadnavis Team Lokshahi
राजकारण

कुणाच्या बापाची हिंमत नाही, का म्हणाले फडणवीस असं?

मुख्यमंत्री दिल्लीला गेल्याने कर्नाटकविरोधात ठराव उद्या, मंगळवारी घेण्यात येईल.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या विषयावर जुंपलेली दिसत आहे. त्यातच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून गदारोळ निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकच्या विरोधात ठराव आज घेण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, मुख्यमंत्री दिल्लीला गेल्याने कर्नाटकविरोधात ठराव उद्या, मंगळवारी घेण्यात येईल, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना शांत केले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून जाणीवपूर्वक वादग्रस्त विधाने करीत महाराष्ट्राला डिवचले जात आहे. परंतु महाराष्ट्र सरकार गप्प बसले असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला. त्यांनी जशास जसे उत्तर देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी बघ्याची भूमिका न घेता कर्नाटक सरकारला गंभीर इशारा देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्या ठराव घेणार असल्याचे सांगताच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाले. भास्कर जाधव यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री वाट्टेल ते ठराव करीत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मान खाली घालुन बसल्याचा आरोप केला. यावर फडणवीस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला लावेल, अशी कुणाच्या बापाची हिंमत नाही, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ambernath Accident : धक्कादायक! अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी पडले; संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

Wardha Crime : शिक्षणासाठी पैसे नसल्याने 17 वर्षीय तरुणीने नैराश्यातून जीवन संपवले

Panchayat Season 5 : प्रेक्षकांना बघायला मिळणार आजी-माजी सरपंचांची लढाई; पुढील वर्षात येणार पंचायत 5 सीझन

Jitendra Awhad On Ashish Shelar : आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया म्हणाले, "मराठी माणसाची तुलना पहलगामच्या घटनेशी.."