Devendra Fadnavis Team Lokshahi
राजकारण

नामांतराच्या श्रेयवादावरून फडणवीसांचा विराेधकांना टोला; म्हणाले, अख्खा महाराष्ट्र बदलून...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो प्रस्ताव मान्य केला. यावर ते कदाचीत म्हणतील की त्यांनीच मोदींना फोन केला म्हणून हा प्रस्ताव मान्य झाला.

Published by : Sagar Pradhan

काल केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराला अखेर मंजुरी दिली. हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून केंद्र सरकारकडे प्रलंबित होता. या केंद्र सरकारच्या निर्णयाचे आता सर्वांकडून स्वागत होत आहे. तर दुसरीकडे यावरून आता श्रेयवादासह आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे. याच श्रेयवादावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना निशाणा साधला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पुण्यात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही लोकांना वाटत की सगळी कामे त्यांच्या काळातच झाली. त्यांचा काळ अडीच वर्षांचा. त्यातील सव्वादोन वर्षांचा काळ घराच्या दाराआड गेला. उरलेल्या अडीच महिन्यांत त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकला असेन, तर मला माहिती नाही. असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय आम्हीच घेतल्याचा दावा केला. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने नामांतराचा मंत्रिमंडळात निर्णय घेतला. त्याबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो प्रस्ताव मान्य केला. यावर ते कदाचीत म्हणतील की त्यांनीच मोदींना फोन केला म्हणून हा प्रस्ताव मान्य झाला. अशी देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसामुळे 366 रस्ते बंद, 929 ठिकाणी वीजपुरवठा खंडित

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट