राजकारण

'त्या' मागणीवर शहाजी बापू पाटलांचा विरोधकांच्या सुरात सुर; म्हणाले...

राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. डोळ्यादेखत पिके सुकत चालली आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अभिराज उबाळे | पंढरपूर : राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. डोळ्यादेखत पिके सुकत चालली असून खरीप हंगाम वाया जाण्याची भीती सतावत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी लावून धरली आहे. अशात, आता सत्ताधाऱ्यांतील आमदारानेही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

उजनी आणि नीरा नदीच्या पाण्यासाठी यावर अवलंबून असणारे शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज पंढरपूरमधील आंदोलनास आमदार शहाजी बापू पाटील यांनी भेट दिली आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शहाजी बापू पाटील यांनी १५ दिवसात सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

उजनी धरणावरील पुणे जिल्ह्यातील धरणात पाणी साठा आहे. पाच धरणातून उजनीत पाणी सोडून पुन्हा उजनी धरणातून १४ टीएमसी पाण्याचं एक आवर्तन करावे, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे. लवकरच होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी सोडण्यावरून मोठी खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gemini Retro Photos : तुम्हाला सुद्धा रेट्रो फोटो तयार करायचा आहे? पण कसा करायचा तेच माहित नाही, मग या स्टेप्स करा फॉलो

IND vs PAK Live Streaming Asia Cup 2025 : विराट-रोहितशिवाय भारत-पाकिस्तान सामना, LIVE कसं पाहता येणार जाणून घ्या....

Ajit Pawar : "मला जे उत्तर द्यायचं ते..." कुर्डूतील IPC अधिकारी प्रकरणावर बोलताना अजित पवारांच पडखर भाष्य

Elphinstone Bridge : "मुंबईकरांनो, एल्फिन्स्टन पुलासंदर्भात महत्त्वाची माहिती; कोणते रस्ते सुरु कोणते बंद जाणून घ्या...