Devendra Fadnavis Team Lokshahi
राजकारण

दगडाला सोन्याची नाणी तर नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

आजची लढाई सत्तेसाठी नसून व्यवस्था परिवर्तनाची लढाई : फडणवीस

Published by : Team Lokshahi

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत पुन्हा एकदा पाणी प्रश्नावरुन राजकारण तापू लागले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात आज भाजपचा जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जलआक्रोश मोर्चा संभाजीनगरच्या इतिहासातला सर्वात अभूतपूर्व मोर्चा आहे. आजची लढाई सत्तेसाठी नसून व्यवस्था परिवर्तनाची लढाई आहे. आम्ही संघर्ष सुरु केला आहे आणि जोपर्यंत संभाजीनगरमध्ये पाणी पोहचत नाही. तोपर्यंत सरकारला रात्री स्वस्थ झोपू देणार नाही. असा निर्धात त्यांनी बोलून दाखवला.

आपल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांना सांगितले की पाणी येत नाही तर ते त्याच्यावर काहीच करायला तयार नाही. ते म्हणतात मी म्हणतो म्हणून संभाजीनगर समजा, मी म्हणतो म्हणून बेफिकर समजा, दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, अशा प्रकारचे आश्वासन आमचे मुख्यमंत्री देतील. कारण ते म्हणतात ती काळ्या दगडावरची रेष आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

हर गर्मी में संभाजीनगर की यही कहानी है, हलख में प्यास है और आंखों में पाणी है, ऊपरवाले तेरे से कोई गिला नही है ये तो निचेवाले तेरे बंदो की बेईमानी आहे, असा निशाणाही फडणवीसांनी शायरीतून शिवसेनेवर साधला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी