राजकारण

राज्यभरात अवकाळी पावसाने शेतीचं नुकसान; फडणवीस म्हणाले…

राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर, काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. यामुळे शेतपिकांना मोठा फटका बसला असून नुकसान झाले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर, काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. यामुळे शेतपिकांना मोठा फटका बसला असून नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अवकाळी पावसासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे. कुठे किती नुकसान झालं याचा प्राथमिक अहवाल घेऊन पाठवण्याचा सूचना दिल्यात. निश्चितपणे राज्य सरकारची भूमिका कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा मदत करतो. वेगवेगळ्या ठिकाणी रब्बी पीक वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहे, पण जिथे नुकसान होईल त्या ठिकाणी सरकार नक्कीच मदत करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभेतील जागावाटपाचा महायुतीचं फॉर्म्युला ठरला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल मी यावर अतिशय स्पष्टपणे सांगितला आहे. आमच्या चर्चा अजून व्हायच्या आहे. फॉर्म्युला चर्चानंतरच ठरेल. पण बेसिक काय असेल जो ज्या सीट लढल्या आहे त्या सीट त्याच्याकडे जाव्या, असा त्याचा बेसिक असणार आहे. त्याचा अर्थ स्टॅटिक आहे का असं नाही. त्यात आवश्यक बदल देखील आम्ही बसून करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज