राजकारण

शिंदे सरकार फक्त अजित दादांना घाबरते; मुंडेंचा टोला

धनंजय मुंडे यांनी शिंदे सरकारवर केली कडाडून टीका

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : सरकार आलं का? स्थापन केले हे त्यांना सुध्दा कळलं नाही. लोकांचे प्रश्न सोडवत नसतील तर धास्ती घेतात. हे सरकार कोणाला घाबरत नाही. ते फक्त विरोधी पक्षनेते अजित दादांना घाबरतात, असा टोला राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी शिंदे सरकारला लगावला आहे. ते बीडमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

धनंजय मुंडे म्हणाले की, नव्याने आलेले सरकार फार मजेशीर आहे. सेना फोडली त्यातून मुख्यमंत्री केलं. भाजपला उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे काय मिळवलं आणि काय गमावलं, असा निशाणा त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

मराठवाड्यावर दादांचे पहिल्यापासून प्रेम आहे. कोविड काळात आघाडी सरकारने मदत दिली. सरकार आलं का? स्थापन केले हे त्यांना सुध्दा कळलं नाही. लोकांचे प्रश्न सोडवत नसतील तर धास्ती घेतात. सरकार बेशिस्त वागत आहे. त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून दादा सरकारला शिस्तीत आणून दाखवलं हे सरकार कसं तेच कळत नाही. हे सरकार कोणाला घाबरत नाही ते फक्त विरोधी पक्षनेते अजित दादाला घाबरतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

सुरत गुवाहाटी गोवा मुंबईत आलं. 42 दिवस सरकार स्थापन करायला लागले. तरी जिल्हयाला पालकमंत्री नाही. पालकमंत्री निवडता आला नाही. एकाकडे 7-8 खाते आहे. त्यातीलही काही जण नाराज आहेत. हे अजब सरकार आहे. मंत्री करायला एवढा वेळ लावतात तर विकास करायला किती वेळ लावणार, अशी धनंजय मुंडेंनी शिंदे सरकारवर कडाडून टीका केली.

आघाडी सरकार मध्ये 700 कोटी विमा मिळाला आणि या सरकारमध्ये फुटी कवडी मिळाली नाही. आम्ही आमचा विमा घेणारच. येत्या काळात सर्व निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा