राजकारण

शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? दिलीप वळसे-पाटील म्हणाले...

अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अजितदादांसोबत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील हेसुद्धा गेले. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर दिलीप वळसे-पाटील यांना शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? असे विचारण्यात आले. यावर माध्यमांशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, हा निर्णय माझ्या एकट्याचा नाही. हा सामुदायिक निर्णय आहे. ४० आमदारांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असा वेगळा निर्णय घेतला आहे.शरद पवारांची साथ सोडली, याचं मनामध्ये १०० टक्के दु:ख आहे. परंतु कधी-कधी असा निर्णय घ्यावा लागतो. असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा