राजकारण

"मुख्यमंत्री झालो तर सर्व पोलिसांना भगव्या टोप्या देईन", शिंदे गटाच्या 'या' आमदाराचं विधान

उध्दव ठाकरेंनी हिंगोलीमध्ये सभा घेत शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले.

Published by : Siddhi Naringrekar

उध्दव ठाकरेंनी हिंगोलीमध्ये सभा घेत शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. याला संतोष बांगर यांनी कावड यात्रेतून उध्दव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. या कावड यात्रेत बांगर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले आहे.

यावेळी शक्तीप्रदर्शन करताना बांगर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी येड्यांची जत्रा उभी केली. येडे काहीही करू शकत नाहीत.बाळासाहेबांनी सांगितलं होतं, आमची सत्ता आली तर सगळ्यांना भगव्या टोप्या देऊ. त्यामुळे कदाचित मी मुख्यमंत्री झालो तर सगळ्या पोलिसांना भगव्या टोप्या देईन. असे बांगर म्हणाले. बांगर यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

 गद्दाराची नाग समजून पूजा केली. पण, हा नाग उलटा फिरून डसायला लागला. साप पायाखाली आल्यावर काय करायचं तुम्हाला कळतं. पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं वाया गेलं असं म्हणत द्धव ठाकरे यांनी रविवारी हिंगोलीत ‘निर्धार सभेतून टीका केली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा