राजकारण

पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होतील; गिरीश महाजनांचा दावा

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल आता समोर येऊ लागले आहेत. यादरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

जळगाव : देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपले आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, तेलंगणात, राजस्थानमध्ये मतदान पूर्ण झाले आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल आता समोर येऊ लागले आहेत. यादरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांनी भाजपचाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

राजस्थान अथवा मध्यप्रदेश सर्व राज्यांमध्ये भाजपचे सरकार येणार असल्याचा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत 325 जागांवर भाजपचाच विजय होणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होणार असल्याचे गिरीश महाजन म्हणाले आहेत.

दरम्यान, काँग्रेस पक्ष या पाचही राज्यात बहुतमाने निवडून येईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. काँग्रेस पक्षाला या पाचही राज्यात जनतेचे मोठे समर्थन लाभले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी या राज्यात झंझावाती प्रचार केला. पाचही राज्यातील वातावरण काँग्रेस पक्षासाठी अनुकूल आहे, असे पटोलेंनी म्हंटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड

The sound of Breaking Fingers : बोटे मोडल्याने आवाज कसा येतो माहीत आहे का? नसेल माहित जाणून घ्या...

Ind Vs Eng : हेझलवूडचा 'तो' सल्ला ऐकला अन् आकाश दीपने इंग्लंडचा फडशा पाडला