राजकारण

पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होतील; गिरीश महाजनांचा दावा

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल आता समोर येऊ लागले आहेत. यादरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

जळगाव : देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपले आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, तेलंगणात, राजस्थानमध्ये मतदान पूर्ण झाले आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल आता समोर येऊ लागले आहेत. यादरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांनी भाजपचाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

राजस्थान अथवा मध्यप्रदेश सर्व राज्यांमध्ये भाजपचे सरकार येणार असल्याचा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत 325 जागांवर भाजपचाच विजय होणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होणार असल्याचे गिरीश महाजन म्हणाले आहेत.

दरम्यान, काँग्रेस पक्ष या पाचही राज्यात बहुतमाने निवडून येईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. काँग्रेस पक्षाला या पाचही राज्यात जनतेचे मोठे समर्थन लाभले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी या राज्यात झंझावाती प्रचार केला. पाचही राज्यातील वातावरण काँग्रेस पक्षासाठी अनुकूल आहे, असे पटोलेंनी म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा