राजकारण

Girish Mahajan : निकाल चुकीचा वाटत असेल तर सर्वोच्च न्यायालयात जा

शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावर ऐतिहासिक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावर ऐतिहासिक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना असल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट करत शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन म्हणाले की, उद्धवजींना वाटत असेल की निकाल चुकीचा, सुप्रीम कोर्टाविरोधात निकाल वाटत असेल, तर सर्वोच्च न्यायालयात जावं. न्याय मागावे. असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, नार्वेकरांवर टिप्पणी योग्य नाही, आक्षेपार्ह आहे. उद्धव आणि संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर बोलणे शोभनीय नाही. त्यांच्यासाठी सर्वोच न्यायालयाचे दारं उघडे आहे. असे महाजन म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा