राजकारण

सेंद्रिय शेतीकडे पूर्णतः जाणे हा वेडेपणा ठरेल : राजू शेट्टी

सांगलीत अग्रणी शिवार महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी राजू शेट्टी बोलत होते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संजय देसाई | सांगली : सेंद्रिय शेतीकडे पूर्णतः जाणे हा वेडेपणा ठरेल, असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. असेच सेंद्रिय शेतीच्या नावाखाली प्रचंड बुवाबाजी आणि फसवणूक चालू आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे. ते सांगलीत अग्रणी शिवार महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. त्यांच्या विधानाची आता चर्चा रंगली आहे.

सेंद्रिय शेती वाढली तर जगामध्ये अन्नधान्याचा आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. सगळ्या जगानं सेंद्रिय शेती करावी या मताचा मी नाही. कारण देश स्वतंत्र झाला त्यावेळी देश सेंद्रिय शेती करत होता. रासायनिक खते, कीटकनाशके माहित नव्हते. त्यावेळी लोकसंख्या 35- 40 कोटीच्या आसपास असताना बाहेरच्या देशातून भीक मागून या देशातील जनतेला अन्नधान्य खायला आणावे लागत होते. आज 40 कोटीची लोकसंख्या 140 कोटीवर गेली. तेव्हा तरी रासायनिक खतांच्या वापरामुळे पुरेसं अन्नधान्य आज मिळत आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारकडून सेंद्रिय शेतीला चालना देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा