Gopichand Padalkar Team Lokshahi
राजकारण

औरंगाबाद अन् उस्मानाबाद नामांतरानंतर पडळकरांनी केली अहमदनगरच्या नामतंराची मागणी

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना अशातच काल केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराला अखेर मंजुरी दिली आहे. अनेक दिवसांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित होता. त्यामुळे या केंद्र सरकारच्या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत होत आहे. तर दुसरीकडे पुन्हा एकदा राजकारण सुरु झाले आहे. याच गोंधळादरम्यान, आता अहमदनगर शहराचे नामकरण करण्याची मागणी पुढे आली आहे. याबाबतची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

नेमकी काय आहे पडळकर यांची मागणी?

औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराला मंजुरी मिळाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून शिंदे- फडणवीस सरकारचे अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले की, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ मा. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात होणारच. अशी मागणी करत गोपीचंद पडळकर यांनी विश्वास व्यक्त केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू