Gopichand Padalkar Team Lokshahi
राजकारण

औरंगाबाद अन् उस्मानाबाद नामांतरानंतर पडळकरांनी केली अहमदनगरच्या नामतंराची मागणी

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना अशातच काल केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराला अखेर मंजुरी दिली आहे. अनेक दिवसांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित होता. त्यामुळे या केंद्र सरकारच्या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत होत आहे. तर दुसरीकडे पुन्हा एकदा राजकारण सुरु झाले आहे. याच गोंधळादरम्यान, आता अहमदनगर शहराचे नामकरण करण्याची मागणी पुढे आली आहे. याबाबतची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

नेमकी काय आहे पडळकर यांची मागणी?

औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराला मंजुरी मिळाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून शिंदे- फडणवीस सरकारचे अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले की, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ मा. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात होणारच. अशी मागणी करत गोपीचंद पडळकर यांनी विश्वास व्यक्त केला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा