राजकारण

राज्यपाल चूकच, पण...: चंद्रशेखर बावनकुळे

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यातील विरोधक आक्रमक झाले आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यातील विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्यपालाविरोधात निदर्शने करण्यात येत असून महाराष्ट्र बंदचा इशाराही दिला आहे. तसेच, राज्यपाल पदावरुन कोश्यारींना हटविण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्याने विरोधकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सष्टीकरण दिले आहे. राज्यपालांची चूक झाली आहे. परंतु, त्यांना ठेवायचे की नाही हे आमचा अधिकार क्षेत्र नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ते खोटं बोलत आहे. वेदांतामध्ये माहिती अधिकारातच समोर आले आहे की मागच्या सरकारने कुठेही वेदांताला जागा दिलेली नाही. त्यासंदर्भात कुठेही बैठक घेतली नाही. त्यामुळे वेदांता परत गेला आहे. वेदांता प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे गेला आहे. उद्धव ठाकरे 18 महिने मंत्रालयातच येत नव्हते. मग, कंपन्या कोणाशी बोलले असते. त्या काळात कुठलेही शासकीय जीआर काढले नाही. जमीन दिली नाही. आता खोटारडेपणाचा कळस करत आहेत, असा पलटवार त्यांनी आदित्य ठाकरेंवर केला.

महाविकास आघाडी सरकारने विमा कंपन्यांना पैसे दिले. मात्र, अडीच वर्षे कधीही आढावा घेतला नाही. कोणत्याही पालकमंत्र्यांनी, कृषीमंत्र्यांनी आढावा घेतला नाही. खरिपाच्या आढावा बैठक सुद्धा त्या काळात झाल्या नाही. पीक विमा कंपन्या सरकारकडून पैसे घेत होत्या. मात्र, खरोखर शेतकऱ्यांना त्यांनी परतावा दिला की नाही हे पाहण्याकडे कोणाचाही लक्ष नव्हते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नव्हते. म्हणून विमा कंपन्यांनी त्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर पैसे खाल्ले. हे मागच्या मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांच्या प्रकरणात जो भ्रष्टाचार झाला आहे, त्याची चौकशी झालीच पाहिजे. उच्चस्तरीय चौकशी करा अशी माझी मागणी आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

उदयनराजे असो किंवा आम्ही. आमची सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही. मात्र, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना ठेवायचे की नाही हे आमच्या अधिकार क्षेत्रात नाही. त्यादिवशी राज्यपालांची चूक झाली आहे. त्यांना ठेवायचे की नाही ठेवायचे हा आमचा अधिकार क्षेत्र नाही, असे स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिले आहे. तर, संजय राऊत नुसते टिवटिव करतात, सामनातून छापून आणतात आणि मग सकाळी मीडियासमोर येतात. आम्ही त्याच त्या बाबींना किती दिवस उत्तर द्यायचं, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

Car Accident CCTV Footage : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं 4-5 जणांना उडवलं

Ramdas Kadam On Thackeray Bandhu: राजकीय भूकंपाची शक्यता?; राज-उद्धव एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांचे खळबळजनक आरोप

Donald Trump : ट्रम्प यांचा मोठा विजय! ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर